Friday, April 06, 2012

पल्लवी रेणके : चळवळीतल्या सर्वांची लाडकी लेक

भटक्या-विमुक्तांचे नेते
पल्लवी रेणके
फुले-आंबेडकरी तत्त्वज्ञानाशी आणि ध्येयवादाशी पक्की नाळ जुळलेली पल्लवी गेलं दशकभर भटक्याविमुक्तांच्या चळवळीसाठी पूर्णवेळ आणि विना मानधन झटत आहे. तिच्या डोळ्यापुढे व्यवस्था परिवर्तनाचं आणि जात, वर्ग, लिंगभेद निर्मुलनाचं स्वच्छ संकल्पचित्र आहे... सामाजिक कार्यकर्ती असलेल्या पल्लवी रेणकेबद्दल सांगत आहेत तिचे वडील, भटक्या-विमुक्तांचे नेते बाळकृष्ण रेणके.

Saturday, March 31, 2012

विचारवंत कलावंत : निळूभाऊ फुले

महाराष्ट्रात अनेक मोठे कलावंत होऊन गेले, पण दुर्गमातल्या दुर्गम खेडय़ापर्यंत आणि तिथल्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचलेली जी काही मोजकी नावे असतील, त्यात निळू फुले यांचे नाव अग्रक्रमाने येते. चित्रपटसृष्टीपुरती तुलना करायची तर फक्त दादा कोंडके आणि अशोक सराफ यांची लोकप्रियता निळूभाऊंच्या जवळपास पोहोचते. त्यातही पुन्हा हे दोघे फक्त लोकप्रियतेच्या बाबतीत निळूभाऊंच्या जवळपास जातात.

Friday, March 23, 2012

ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांचे निधन

ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी (वय 92) यांचे आज (गुरुवार) मुंबईतील लीलावती

धगधगते क्रांतिपर्व- क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी

क्रांतिवीर नागनाथअण्णा
क्रांतिवीर नायकवडी म्हणजे क्रांतिकारी पर्वातील एक महत्त्वाचा अध्याय. शेवटच्या श्‍वासापर्यंत जग बदलण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि लढाईतून यशोगाथाही तयार केल्या.

क्रांतिवीर नागनाथ नायकवडी म्हणजे आपल्या आधुनिक इतिहासातील एक धगधगते क्रांतिपर्वच म्हणावे लागेल. स्वातंत्र्यपूर्व काळात अगदी बालवयातच आपल्या कोवळ्या मुठीत क्रांतीचा अंगार आणि धगधगता निखारा घेऊन ते घराबाहेर पडले ते घरात पुन्हा पाऊल न ठेवण्याची शपथ घेऊनच.

Thursday, March 22, 2012

पुरोगामी महाराष्ट्राचे शिल्पकार - यशवंतराव चव्हाण

यशवंतराव चव्हाण      
१२  मार्च, पुरोगामी महाराष्ट्राचे एक शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांची जयंती. तसेच त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सुरुवात. यशवंतराव चव्हाण यांचा जन्म १२ मार्च १९१३ रोजी झाला. त्यांच्या ७० वर्षांच्या आयुष्यात साहेबांनी जे काम केले आणि महाराष्ट्राची आणि देशाची जी सेवा केली ती स्वातंत्र्य प्राप्तीनंतरच्या काळातील काहीच एकमेवाद्वितीयांपैकी एक. साहेबांनी संतांची आणि समाज सुधाकारांची पार्श्वभूमी असणाऱ्या महाराष्ट्रात पुढे त्याच पायावर शिवाजी महाराज-फुले या आणि अशा अनेकांच्या विचारांच्या प्रेरणेने नव्या महाराष्ट्राचा कळस उभा केला. महाराष्ट्रातील राजकारणाला अतिशय आदर्श असे मापदंड घालून दिले. व्यक्तिगत आणि क्षेत्रीय विचारांच्या पलीकडे राष्ट्रहितासाठी राजकारण हा जो पायंडा महाराष्ट्रातील राजकीय चळवळीला लाभलाय तो म्हणजे यशवंतरावांचीच देन.

Sunday, March 18, 2012

Saturday, March 17, 2012

'आंबेडकर' समजून घ्या!

डॉ. भालचंद्र मुणगेकर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर
आधुनिक भारताच्या जडणघडणीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान ऐतिहासिक स्वरूपाचे आहे. मात्र असे असूनही आपल्या एकूणच सार्वजनिक जीवनात त्यांचे हे ऐतिहासिक योगदान ध्यानात घेतले जात नाही, ही या देशाची एक फार मोठी शोकांतिका आहे. डॉ. आंबेडकरांच्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू पाहिले की कुणीही आश्चर्याने थक्क व्हावे.

अमेरिकेतील विश्वविख्यात कोलंबिया विद्यापीठ आणि इंग्लंडमधील लंडन विद्यापीठ (सध्याचे लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स) या दोन विद्यापीठांच्या अनुक्रमे पीएच. डी. आणि डी. एस्सी. या पदव्या घेतलेला एक श्रेष्ठ अर्थशास्त्रज्ञ; 'मूकनायक' आणि 'बहिष्कृत भारत'चे झुंजार संपादक;

Tuesday, March 13, 2012

ऐसी थी महान महारानी माँ अहिल्याबाई..

अहिल्यामाई होळकर
ऐसी थी महान महारानी माँ अहिल्याबाई...,
समाज का अंधकार नष्ट करके,
परिवर्तन की ज्योत लायी,
पूरब से पच्छिम तक,
उत्तर से दक्षिण तक,
जनहित के लिए स्वार्थ बिना कार्य करते आयी,
सभी धर्म जातियों भाषाओंका का सन्मान करते हूए,
सर्वधर्मसमभाव का आदर्ष लेकर आयी !
ऐसी थी महान,  महारानी माँ अहिल्याबाई..

Wednesday, March 07, 2012

जातीअंतासाठी आंतरजातीय विवाह आवश्यक

पुरोगामी महाराष्ट्रात प्रत्येक सामाजिक चळवळीमध्ये अग्रेसर असणारा सातारा जिल्हा. या सातारा जिल्ह्यातील औंध या गावी माणुसकीला काळीमा फासणारी ‘ऑनर किलिंग’ ची घटना घडली. या गावातील आशा शिंदे ही उच्चशिक्षित तरुणी. साताऱ्याच्या सोशल सायन्स कॉलेजमधून तिने एम. एस. डब्ल्यू. केले होते. पुण्यातील एका नामांकित कंपनीत ती कार्यरत होती. विचाराने आधुनिक. जात-पात या गोष्टी गौण आहेत असे तीचे मत. ती एका परजातीतील मुलाच्या प्रेमात पडली

Sunday, March 04, 2012

आद्य महिला स्वातंत्र्य सेनानी भीमाबाई होळकर !

जागतीक पातळीच्या इतिहाससंशोधकांनी आद्य महिला स्वातंत्र्य सेनानीचा सन्मान दिलेल्या भीमाबाई होळकरांना आमच्या इतिहासाने मात्र काळाच्या कालकुपीत दफन करुन ठेवले आहे, हे एक दुर्दैवच आहे. आज जागतीक महिला दिनाच्या निमित्ताने अठराव्या शतकात शिक्षित असलेली, परंपरेच्या जोखडाखाली न वाढवली गेलेली, पिता यशवंतराव होळकरांच्या पावलावर पाउल ठेवत ब्रिटिशांशी सर्वकश युद्ध पुकारणारी ही महान वीरांगना.

Tuesday, February 28, 2012

NEH5KUH2684H

Saturday, February 25, 2012

बहुजन समाज आत्मपरीक्षण करणार का?

हा लेख बहुजनांच्या विरोधात किंवा ब्राम्हणांच्या बाजूने नाही. बहुजनांनी आत्मपरीक्षण करावे या एकाच हेतूने तो लिहिला आहे. - महावीर सांगलीकर.

स्वत:ला बहुजन समजणा-या प्रत्येकाने आता आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. पहिली गोष्ट म्हणजे भारतात बहुजन नावाचा कोणताही समाज अस्तित्वात नाही. जशी हिन्दू या शब्दाची व्याख्या नाही, तशीच बहुजन या शब्दाचीही व्याख्या नाही. ब्राम्हण सोडून बाकी सगळे बहुजन ही बहुजन या शब्दाची व्याख्या होवू शकत नाही

Tuesday, February 21, 2012

स्वतंत्र पुरोगामी भूमिका घेणे म्हणजे ब्राह्मणद्वेष का ?

सह्याद्री बाणावर लिखाण करताना एक आरोप नेहमीच होत आला आहे तो म्हणजे ब्राह्मणद्वेष. तुम्ही ब्राम्हणांचा द्वेष करता असे मला अनेक ब्राम्हण  म्हणतात. पण मी कसा ब्राह्मणद्वेष करतो ते मात्र सांगत नाही. मला आश्चर्य वाटते की मी इतकी संयमी मांडणी करूनही हे लोक नेहमी तेच-तेच आरोप करून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात. माझ्यावर ब्राम्हणद्वेषाचा आरोप करणाऱ्या लोकांना मी एका प्रतिक्रीयेद्वारे उत्तर दिले आहे. ती प्रतिक्रिया पुढीलप्रमाणे-

.

.

 
Design by Wordpress Theme | Bloggerized by Free Blogger Templates | coupon codes